Ad Code

#politics काॅंग्रेसचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही, भाजप नेते राम कदमांचा टोला


मुंबई ः राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तिन पक्षाचे सरकार आहे. मात्र काॅंग्रेस सतत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा देतेय, यावरुन असे दिसतेय की काॅंग्रेस नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर विश्वास नाही. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतत स्वबळलाचा नारा देत असल्याने ते स्पष्ट होतेय असा टोला भाजप नेते आमदार राम कदम यांनी लगावला. काॅग्रेस मुख्यमंत्र्यावर नाराज आहे असे  ते म्हणाले. 

------

वाचा ः मला कोणी शिकवायची गरज नाही, संभाजीराजेचा पलटवार

------

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस असे  तीन पक्ष आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून काॅंग्रेस आगामी निवडणूका स्वबळावर लढणार असल्याचे सांगत आहे. त्यावर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम कदम यांनी काॅंग्रेस नेत्यांना टोला मारला आहे.

-----
------
सरकार आणि आघाडी एकसंघ टिकेल असेल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी स्पष्ट करतानाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र त्यांचे प्लाॅनिंग वेगळे असेल. अम्ही स्वबळावर लढणार असे त्यांनी विदर्भातील दौऱ्यात स्पष्ट केले. एनवेळी नाही तर आजपासूनच आम्ही तयारी करत असल्याचे आणि तुम्ही पण तयारी करा असे  सांगायचे आहे. असे पटोले म्हणाले होते. त्यावर राम कदम यांनी वृत्तवाहिनीशी प्रतिक्रिया दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu